Monday, March 22, 2021

पाणी


 पाणी


झाडी झुडपे लावूनीया
करु पर्यावरणीय जतन
वनराजी वाढवूनीया
होईल पाण्याचं संवर्धन

रानावनात बंद करु वृक्षतोड 
पाऊस वाढेल जेणेकरून
पाणी शेतीला  मिळेल
दुष्काळाचं भय संपवुन

शेतीमळ्याला मिळाले खुप पाणी
तर  सुखी होईल शेतकरी माझा
भरपूर पिकलेल्या धान्याने समृद्ध 
होईल सुखी ह्या भूमीचा राजा

धनधान्य संपत्ती वाढवून तो
हात भार लावतो प्रगतीला
पाणी आहे सर्वांसाठी संजीवनी 
आणि आवश्यक जीवनाला

ओमप्रकाश शर्मा
नाशिक

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...